CoronaVirus In Chandrapur: कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असुन गत 24 तासात जिल्ह्यात 352 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 308 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे..
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 87, चंद्रपूर 7, बल्लारपूर 33, भद्रावती 16, ब्रह्मपुरी 19, नागभीड 19, सिंदेवाही 6, मुल 23, सावली 8, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 4, राजुरा 24, चिमूर 25, वरोरा 3,कोरपना 24, तर जिवती येथे 5 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
प्रशासनाचे आवाहन:- नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.